आदित्य ठाकरे यांचा आरोप   

मुंबईची ‘तुंबई’ होण्याला भाजप, शिंदेच जबाबदार

मुंबई,  (प्रतिनिधी) : पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबून निर्माण झालेल्या परिस्थितीला भाजप आणि एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच ही परिस्थिती ओढावली, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. पावसामुळे जी परिस्थिती ओढावली आणि ज्या मुंबईकरांच्या घराचे आणि दुकानांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून त्यांना सरकारी तिजोरीतून तात्काळ मदत द्या, अशी मागणीही आदित्य यांनी केली.
 
सोमवारी विक्रमी पावसाने मुंबईची दैना झाली होती. शहरातील अनेक भागात पाणी तुंबल्याने मुंबई जलमय झाली होती. यापार्श्वभूमी आदित्य ठाकरे यांनी काल मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या स्थितीसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला.

Related Articles